नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची दगावलेल्या जनावरांचे, सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत तात्काळ द्या.
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जा. :- मागील वर्षी व चालू वर्षाला नैसर्गिक आपत्तीमुळे जळगाव जामोद तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या तर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पावसांसह विजा झाल्या त्यामध्ये अनेक मुकी जनावरे मृत्युमुखी पडले तसेच सर्पदंशामुळे अनेकांना आपला जीव गमावा लागला व वन्य प्राण्यांमुळे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्यानी शेतकऱ्यांची पिके उध्वस्त केल्यामुळे खूप मोठे नुकसान झालेले आहे तरीसुद्धा हे कुटुंब मदतीपासून वंचित.
मागील वर्षी जळगाव तालुक्यातील वडशिंगी येथील शेतकरी गोपाल वानखडे या शेतकऱ्यांची सततची होत असलेली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली या प्रकरणाला गेली काही महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा निधी अभावी या शेतकऱ्याला आजपर्यंत ही शासनाकडून कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत देण्यात आली नाही.यावर्षी २३ जूनला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसासह विजांचा कर्कळा तालुक्यामधील अनेक गावांमध्ये झाला त्यामध्ये तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांची जनावरे विजांमुळे मृत्युमुखी पडले यामध्ये शासन स्तरावर पंचनामे करून सुद्धा आजपर्यंत कोणत्याच प्रकारचा या कुटुंबाला आर्थिक मदतीचा दिलासा देण्यात आलेला नाही.तसेच तालुक्यातील सुनगाव येथील सोनटक्के कुटुंबातील रामदास देविदास सोनटक्के शेतकऱ्याला सर्पदंश झाल्यामुळे या कुटुंबातील व्यक्ती अनेक वेळा संबंधित विभागाकडे वारंवार कागदपत्रांचा पाठपुरावा करून सुद्धा आजपर्यंत या कुटुंबाला कोणत्या प्रकारची मदत मिळाली नाही.व काही गावांमध्ये वन्य प्राण्यांनी शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेले काही पिके जमीन दोस्त करण्याचा सपाटात चालू केल्यामुळे या जनावरांना आवर घालावी तसेच या शेतकरी कुटुंबांना भरीव आर्थिक मदत शासन स्तरावर देण्यात यावी वरील सर्व मागण्या रास्त असून त्या निकाली काढून तात्काळ संबंधित कुटुंबांना आर्थिक मदत द्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा नायब तहसीलदार यांना देण्यात आला यावेळी अक्षय पाटील ,अशपाक देशमुख ,अजय गिरी, गणेश सिंग परिहार, प्रज्वल वानखडे, , मोहन वडांळे, तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.